शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक क्षेत्रात श्रेयवादाची लढाई : मकरंद अनासपुरे -जिल्हा टंचाईमुक्त करण्यावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:45 IST

सांगली : क्षेत्र कोणतेही असो, त्याठिकाणी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशा परिस्थितीत नाम फौंडेशन जनतेच्या सहभागातूनच जलसंधारणाच्या कामावर भर देत आहे.

सांगली : क्षेत्र कोणतेही असो, त्याठिकाणी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशा परिस्थितीत नाम फौंडेशन जनतेच्या सहभागातूनच जलसंधारणाच्या कामावर भर देत आहे. ‘नाम’ला कोणतेही श्रेय नको असून, आजवर झालेल्या कामाचे तमाम जनतेला श्रेय दिले पाहिजे. यापुढेही दुष्काळ मुक्तीसाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन नाम फौंडेशनचे संस्थापक, प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सोमवारी येथे केले.

जलसंधारणातील कामातील नाम फौंडेशनच्या योगदानाबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अनासपुरे पुढे म्हणाले की, जत, माण, आटपाडी तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी जे काम झाले आहे, त्यात तेथील नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यात ‘नाम’ची भूमिका निमित्तमात्र आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन केलेल्या कामाचीच ही पोहोचपावती आहे. समाजात या ना त्या कारणाने कडवटपणा वाढत चालला असताना, गेल्या अडीच वर्षात ‘नाम’ने प्रभावी केले काम केले आहे.

शिवारे जलयुक्त करणे हेच एकमेव उद्दिष्ट असून कोणतेही राजकारण केले जाणार नाही. गेल्यावर्षी जिल्ह्यात २० गावात कामाचे उद्दिष्ट होते. यंदा ५० गावात कामाचे नियोजन असून १३ कामे सुरू झाली आहेत.जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील म्हणाले की, गेल्यावर्षी याच दिवसात जिल्ह्यात १५१ टॅँकर सुरू होते. आता एकही टॅँकर नाही. यावरून वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या कामाची प्रचिती येते. आठवड्यातील दोन दिवस अधिकारी व कर्मचारी स्वत: काम करणार आहेत.यावेळी नाम फौंडेशनचे गणेश थोरात, अविनाश सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, स्मिता कुलकर्णी, किरण कुलकर्णी, अश्विनी जिरंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.‘आभाळमाया’तर्फे निधीचा धनादेशजलयुक्तच्या कामासाठी येथील आभाळमाया फौंडेशनच्यावतीने जिल्हा प्रशासनास ८ लाख ८८ हजार ८८८ रूपयांच्या निधीचा धनादेश मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी म्हणजे तोफखानामकरंद अनासपुरे म्हणाले की, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहे. ते म्हणजे तोफखाना असून त्यांचा कामाचा धडाका यापूर्वीही अनुभवला आहे. जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत असल्याचा माझा अनुभव आहे.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरेSangliसांगली