शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक क्षेत्रात श्रेयवादाची लढाई : मकरंद अनासपुरे -जिल्हा टंचाईमुक्त करण्यावर भर; दुष्काळ मुक्तीसाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:45 IST

सांगली : क्षेत्र कोणतेही असो, त्याठिकाणी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशा परिस्थितीत नाम फौंडेशन जनतेच्या सहभागातूनच जलसंधारणाच्या कामावर भर देत आहे.

सांगली : क्षेत्र कोणतेही असो, त्याठिकाणी श्रेयवादाची लढाई सुरू आहे. अशा परिस्थितीत नाम फौंडेशन जनतेच्या सहभागातूनच जलसंधारणाच्या कामावर भर देत आहे. ‘नाम’ला कोणतेही श्रेय नको असून, आजवर झालेल्या कामाचे तमाम जनतेला श्रेय दिले पाहिजे. यापुढेही दुष्काळ मुक्तीसाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन नाम फौंडेशनचे संस्थापक, प्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सोमवारी येथे केले.

जलसंधारणातील कामातील नाम फौंडेशनच्या योगदानाबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अनासपुरे पुढे म्हणाले की, जत, माण, आटपाडी तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी जे काम झाले आहे, त्यात तेथील नागरिकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यात ‘नाम’ची भूमिका निमित्तमात्र आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन केलेल्या कामाचीच ही पोहोचपावती आहे. समाजात या ना त्या कारणाने कडवटपणा वाढत चालला असताना, गेल्या अडीच वर्षात ‘नाम’ने प्रभावी केले काम केले आहे.

शिवारे जलयुक्त करणे हेच एकमेव उद्दिष्ट असून कोणतेही राजकारण केले जाणार नाही. गेल्यावर्षी जिल्ह्यात २० गावात कामाचे उद्दिष्ट होते. यंदा ५० गावात कामाचे नियोजन असून १३ कामे सुरू झाली आहेत.जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील म्हणाले की, गेल्यावर्षी याच दिवसात जिल्ह्यात १५१ टॅँकर सुरू होते. आता एकही टॅँकर नाही. यावरून वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या कामाची प्रचिती येते. आठवड्यातील दोन दिवस अधिकारी व कर्मचारी स्वत: काम करणार आहेत.यावेळी नाम फौंडेशनचे गणेश थोरात, अविनाश सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, स्मिता कुलकर्णी, किरण कुलकर्णी, अश्विनी जिरंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.‘आभाळमाया’तर्फे निधीचा धनादेशजलयुक्तच्या कामासाठी येथील आभाळमाया फौंडेशनच्यावतीने जिल्हा प्रशासनास ८ लाख ८८ हजार ८८८ रूपयांच्या निधीचा धनादेश मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी म्हणजे तोफखानामकरंद अनासपुरे म्हणाले की, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहे. ते म्हणजे तोफखाना असून त्यांचा कामाचा धडाका यापूर्वीही अनुभवला आहे. जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत असल्याचा माझा अनुभव आहे.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरेSangliसांगली